Pages

माझी डागांपासुन सुटका -व्याधी कथा.


मी श्री.गोपाळ दामोदरराव वैद्य,मुळ गाव पैठण तालुक्यातील  नांदर,जि.औरंगाबाद. वय वर्षे ४७.
मित्रांनो ,
एखाद्याच्या शरीरावर कुठेही पांढरे डाग असणे म्हणजे काय असते हे मी चांगलेच अनुभवलेले आहे.ते सहन करणे म्हणजे काय हे ज्याचे तोच जाणे, हे शब्दात सांगणे म्हणजे एखादा पट्टीचा लेखकच सांगू शकतो
माझ्या आयुष्याची पूर्ण उमेदीची बावीस वर्षे मी या प्रश्नात गुरफटलेला होतो. पण मी थकलो नाही किंवा हताश झालो नाही देवाची कृपा.मी या व्याधींपासून माझी कशी सुटका करून घेतल,हे औषध काय आहे,ते कसे काम करते,आणि अजून बरेच काही , हे सर्व आपण या ब्लॉग वर जाणून घ्यावे असे मला वाटते.
त्यावेळी मी वीस वर्षांचा होतो.
एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर माझ्या लक्षात आले कि माझ्या खालच्या ओठांचा रंग काहीसा बदललेला आहे.मी त्या दिवशी दुर्लक्ष केले पण हे नंतरच्या काही दिवसात वाढतच गेले आणि माझी झोप उडाली.
या गोष्टीमुळे माझे घरातील सगळेच हवालदिल झाले,विशेषतः माझे वडील जे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते ते खूप परेशान झाले.
माझे वडील आणि आजोबा आमच्या परिसरात एक नामांकित वैद्य म्हणून प्रसिद्ध होते,आमचे आडनाव वैद्य पडले,त्यामागचे कारणही त्यांची वैद्यकी हेच होय,यामुळे माझ्या वडिलांचे खूप परेशान होणे हे साहजिकच होते हे आपल्या लक्षात आलेच असेल. 
माझ्यावडिलांकडे खूप दुरवरुन जुनाट आणि असाध्य रोग ज्यांना आहे असे लोक येत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा लौकिक होता ,याचबरोबर एक सदहृदयी व्यक्ती म्हणून लोक त्यांना आदर देत.
यानंतर सुरु झाले या व्याधीचा इलाज करणे. 

सुरुवातीला मी इलाज करून घेण्याच्या विरोधातच होतो, कारण मला हे सर्व अपमानास्पद वाटायचे. मला स्वतः लाजल्यासारखे वाटायचे. काही दिवसानंतर मात्र मला एक गोष्ट पूणपणे लक्षात आली कि हि काही साधारण ,सहज नीट होईल अशी व्याधी/आजार नाही कि ज्याला सहजपणे घेता येईल.याचा इलाज करावाच लागेल. मी तयार झालो.
आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू झाल्या-वेगवेगळे उपचार,डॉक्टर्स,स्पेशलिस्ट्स... पूर्ण बावीस वर्षे.. !!
या संपूर्ण बावीस वर्षांत मी दोन तीन वेळा ७० टक्क्यांपर्यंत डाग मुक्त झालो होतो ,पण पूर्णपणे कधीच नाही.
बावीस वर्षांच्या मध्यंतरी एकदा वैतागून मी एक मोठी चूकही केली. मी एक जाहिरात वाचून एका दवाखान्यात ओठावर सर्जरी करून घेतली.मी काही दिवस खुश राहिलो,कारण सर्जरी करूनसुद्धा माझ्या ओठांवर डाग परत आले. मला एक गोष्ट त्या वेळी कळलीच नव्हती  कि रोग हा मुळापासून जावा लागतो-वरचे उपचार हे वरच्या वर काम करतात.
परत आधीचेच उपचार चालू केले,पण मी गोळ्या,औषधी घेऊन आणि ऊन्हात बसुन वैतागलो होतो. येथे थोडेसे उन्हाबद्दल सांगतो.कोडासाठी,पांढऱ्या डागांसाठी कुठलेही उपचार करा,त्या पेशंटला उन्हात बसवणे हे आलेच,कारण फक्त उन्हापासूनच व्हिटॅमिन D मिळते जे कि रंग द्रव्य निर्मितीसाठी आवश्यक असते.
असो,
 मी उपचार करून थकलो होतो आणि या निष्कर्षा पर्यंत आलो कि हे डाग आता आपल्याबरोबरच नष्ट होणार ,त्या अगोदर केवळ अशक्य.
मी इलाज करायचे थांबवले होते आणि मला आता त्याची सवयसुद्धा झाली होती ,पण मी शोधणे मात्र सोडले नव्हते.
मध्ये बराच काळ गेला होता. माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि माझे लग्न पण झालेले होते.
एके दिवशी एका कुरापतखोर माणसाने  मला माझ्या चेहऱ्यावरील डागावर उचकवलेच ,त्याबरोबरच अशी पुस्ती जोडली कि माझे आजोबा जरी असते किंवा वडील जरी असते ,तरी त्यांनापण हा आजार बारा करणे सोपे नव्हते ,जगातले कुठलेच औषध हा आजार नीट करू शकत नाही.
मला या माणसाचे बोल खुप लागले आणि खूप वाईट वाटले.मनोमन खूप राग आला.
आणि मी कामाला लागलो.
मी त्या दिवशी सलग नऊ तास आजोबांच्या आणि वडिलांच्या वह्या ,जुनी पुस्तके चाळत होतो.मला चरक संहितेत "सर्व कुष्ठ हर योग " सापडला.
आयुर्वेद शास्त्रानुसार पांढरे डाग,लाल डाग,कोड हे सर्व कुष्ठ रोगाचेच प्रकार आहेत,म्हणजे एकूण आठरा प्रकारांपैकी हे एक-एक आहेत.
आपण ज्याला सरसकट कुष्ठ रोग म्हणतो तो म्हणजे कुष्ठ प्रकारातला सर्वात भयंकर असा गलीत कुष्ठ होय ज्याला समाजात महारोग असेही म्हणतात.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला संहितेत सापडलेले औषध हे सर्व कुष्ठ हर-म्हणजे सगळेच आठरा प्रकारच्या कुष्ठावर इलाज करणारे असे रामबाण औषध म्हणून उल्लेखित केलेले होते.
माझ्या हाती फक्त औषधाचे वर्णन होते, खरे काम पुढे होते ते म्हणजे हे बनवायचे कसे ? कारण यासाठी मला १९ प्रकारच्या वनस्पती त्यांच्या पंचांग स्वरूपात लागणार होत्या. पंचांग स्वरूपात म्हणजे पण ,फुल,फळ,मुळ आणि साल .हे खूप कठीण वाटणारे काम मी जुळवून आणले. अत्यंत महतप्रयास करून शेवटी औषध बनवले आणि मी स्वतः हे औषध घेण्यास सुरुवात केली.
त्या नंतरच्या सहा महिन्यात मी पूर्णपणे -१०० टक्के बरा झालो.


मी पूर्णपणे व्यवस्थितपणे बारा झालो. मी एव्हढ्यावरच थांबलो नाही तर मागील चार वर्षात चार जणांना पूर्ण लाभ पोहोचवला.यात मला खूप समाधान मिळाले.मला जास्त आनंद याचा वाटतो कि माझ्या शेवटाला डाग माझे सोबती असणार नाहीत.
या व्याधीने ट्रस्ट असणारे खूप लोकांना मी अनुभवले आहे.
आणि माझे तरी काय?
 मी आता इतक्या वर्षांनी का होईना पण पूर्ण बरा झालो एव्हढेच काय ते समाधान.
बाकी?
मी एकदा असेच यावर विचार करत बसलो कि आपण कसे कसे यातून बाहेर पडलो. खूप काळ  मागे जाऊन पाहिले नि माझ्या लक्षात आले कि या आजारामुळे आपण खूप काही गमावले.
कारण ?
एकच-कोड-पांढरे डाग-ल्युकोडर्मा-एव्हढे एकच .
मला आता जाणवले कि आपण पूर्ण खुल्या मनाने वावरलोच नाही,एक प्रकारची आत्मविश्वास गमावलेल्या माणसासारखी परिस्थिती होती.सगळीकडे वावरताना मला खूप अडचणी येत होत्या. घरी-दारी,कॉलेज,समाजात सगळीकडे.मी माझ्या त्यावेळच्या नशिबाला दोष देऊ लागलो.देवाची कृपा हि कि एव्हढे असूनही मी शिक्षण पार केले,नोकरी मिळवली.
सगळे काही व्यवस्थित असून मला आतून हि गोष्ट बोचत राहायची. यामुळे मी समोरच्या माणसाला काहीसा विचित्र स्वभावाचा आहे असे वाटायचे. या एकाच गोष्टीमुळे मी बऱ्याच जणांना दुरावला गेलो ,काहीजण मला दुरावले. मला या गोष्टीचे वाईट वाटते.
आपण कितीही मोठ्या गोष्टी करोत ,पण एक गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगू शकतो कि  आपला समाज आजही पांढरे डाग -कोड याकडे वेगळ्या नजरेने बघतो.एव्हढा कि एखादा मनाने कमजोर असणारा माणूस आयुष्यातून उठू शकतो.
या सर्व गोष्टी मी चांगल्याच समजू शकतो ,म्हणूनच या व्याधी पासून जास्तीत जास्त लोकांना मी मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचाच एक भाग म्हणजे हा ब्लॉग आहे.
याद्वारे ,मला असे वाटते कि लोकांना याचा लाभ मिळेल आणि मला समाधान-मानसिक आणि आर्थिक.
आपण या ब्लॉगवर पाहू शकता कि ,
हा आजार म्हणजे काय?
का होतो?
काय उपाय करता येतो?
बरे होण्याचे काही ठोस प्रमाण मी दिलेत का?
किती खर्च येतो?
आणखी बरेच काही.
मित्रानो,
आपणास किंवा आपल्या परिचितांस हि व्याधी  जर असेल तर मी आपल्याला विश्वास देतो कि पूर्णपणे चांगले पथ्य जर पाळले आणि नियमित उपचार जर केले तर एक वर्षाच्या आत आपण यातून मुक्त होऊ शकता.

No comments:

Post a Comment